Thursday, April 23, 2015

यूँ ना मुड़ मुड़कर देखिये हमारी और
ऐसा न हो मुद्दत से मुन्तज़िर दिलोंसे कोई खता हो जाए

छोड़िये ये शर्मो हया, इससे पहले की रुसवा शबाब हो
उठाइये हिजाब चेहरे से, के रोशन आफताब हो जाए 

सम्हलकर रखना कदम, के नींद न खुले सपनों की
चैन न पाये फिर जिंदगीभर कोई, नजर जिसे आप हो जाए

मूँद लीजिये सुरमयी पलकें, के सियाह रात आजाद हो
भटके है मुसाफिर कूचेमें, एक नजर देखिये के महताब हो जाए

संवर लीजिये इन जुल्फों के बिखरे पेचों को
कैद इस कफसमें गलतीसे न कोई सैय्याद हो जाए 
हसरतों में आप के बर्बाद हुए कितने
हम नहीं चाहते की कोई और "नवाज" हो जाए

Tuesday, January 8, 2013

सारं काही

कोपरयातलं एक टेबल, त्यासमोर मांडलेल्या खुर्च्या
दोन स्ट्रॉ घातलेली एक मँगोलाची बाटली आणि त्याकडे एकटक पाहणारी तू
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे

स्टेशनवरचं घड्याळ, पुलाखालची नेहमीची ठरलेली भेटण्याची जागा
एक थ्रू-ट्रेन धडाडत जाणारी आणि तू दचकून धरलेला माझा हात
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे

वळणावरचा रिकामा बसस्टाँप, त्यावर डवरलेलं सोनमोहोराचं झाड
आणि अचानक आलेल्या वाऱ्याने आपल्यावर केलेली पिवळ्या फुलांची पखरण
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे

शेवटच्या क्षणी मिळवलेले कॉन्सर्टचे पास, रांगेत झालेली चुकामुक
आणि त्या काळोखातही मला बरोबर शोधणारी तुझी नजर
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे

जुन्या वहीच्या कव्हरात जपून ठेवलेले फोटो, आठवणींचे किस्से
शुल्लक भांडणाची कारणं आणि मग कॉफीसोबत न संपणारी स्पष्टीकरणं
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे

दरख्वास्त


इश्क इतनाभी न कीजिये हमसे के सारी उम्र आपकी हमारे लिए संवरनेमे गुजर जाए
इश्क इतनाभी न कीजिये हमसे के आईने छोड आपको इन आंखोंमें झांकने का मन हो जाए

इश्क इतनाभी न कीजिये हमसे के दिलसे निकला हर गलीज ख़यालभी गजल कहलाये
इश्क इतनाभी न कीजिये हमसे, के कलाम-ए-पाक से पहले जूबांपार आप का नाम आये
इश्क इतनाभी न कीजिये हमसे, के पल्के झपकनेकोभी एक अरसा लगने लगे
इश्क इतनाभी न कीजिये हमसे, के लबों के बीच की दूरी भी फासला लगने लगे
इश्क इतनाभी न कीजिये हमसे के इन बाहोंकी तपीश में जलकर सुलघने का मन करे
इश्क इतनाभी न कीजिये हमसे के इन जुल्फोंकी सलांखोंमें बारबार उलझने का मन करे
इश्क इतनाभी न कीजिये हमसे के रिश्तो में गिलो-शिकवो की अहमियत न रहे
इश्क इतनाभी न कीजिये हमसे के उसे निभाने के लिये वादे-कसमों की जरूरत न रहे
इश्क इतनाभी न कीजिये हमसे के सौतन जिंदगीको हर बात पर आपकी शिकायत करनी पडे
और इश्क इतनाभी न कीजिये हमसे के मौत को भी हमे छुनेसे पहले आपसे इजाजत लेनी पडे

फ्रेंडशिप

मनगटाला बांधू नकोस
हातभर रंगवून ठेवू नकोस
फक्त मनाच्या कोपऱ्यात जपून ठेव
मित्र म्हणत असशील तर

नको सजवू मखमली कागदांवर
आणि शब्दांत तर मुळीच शोधू नकोस
बस जेव्हा एकटं वाटेल तेव्हा आठवत चल
मित्र म्हणत असशील तर

खंडीभर शुभेच्छा देऊ नकोस
पत्राला उत्तरही पाठवू नकोस
फक्त आपला जुना फोटो बघून हस
मित्र म्हणत असशील तर

नको देऊस फुलं मला शोभेची
भेटींच्या ओझ्यानीही दडपू नकोस
चालताना खांद्यावर हात तेवढा टाक
मित्र म्हणत असशील तर :)

तुटले

तुटले

संदीप खरेंची "काळेभोर डोळे" नावाची कविता आणि संदीप-सलील यांच्या “आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे (तुटले)” ह्या प्रसिद्ध गाण्याचे मी केलेले विडंबन

मूळ कविता आणि चाल इतकी सुंदर आहे की मला फार काही करायची गरज पडली नाही :)


मूळ कविता...

http://sandeepkharekavitangaani.blogspot.in/2010/02/blog-post_03.html



तुटले

(ही कविता आहे मंदगती प्रोसेसर, कूर्मगती कनेक्शनस आणि त्यामुळे झालेल्या गोंधळावर)


"आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...
बाकी सारे आवाज, चित्कार..

बाकी सारे आवाज, चित्कार, प्रकाश, अंधार
मागे पडत चाललेल्या बिलांसारखे मागे जात जात फाटत चाललेत
डीलीट करावेत आकडे हजार आणि भरावेत पुन्हा हजार
तसा प्रोटोकॉल
त्याच्या पाठीमागे
बंद झालेले निळेशार पडदे
सुन्न झालेल्या प्रोग्राम्सची यादी
काळे पांढरे धुळीचे पुंजके
आणि पायात गुंतलेल्या वायरींचे अखंड जाळे

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

"फॉर्म जसे मी पैसे देऊन भरले
अन खिशावर ओझे नवे अवतरले
महिन्याच्या आत एका क्षणात
लोहबंध ते विस्कटले"

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

विसरत चाललोय दर आठवड्याला येणाऱ्या इंजीनीयरचे नाव
विसरत चाललोय एक्स्चेंजचे हेलपाटे, सुट्टीसाठी रोजचे बहाणे
वा CPU च्या मागे नेमक्या भागावर घातलेली लाथ
ती लाथ तर केव्हाच बसली, मास्तरांच्या छडीसारखी
सर्वर मात्र अजूनही तिथेच,
पण त्याचीही PACKETS  किमान चारदातारी त्याच ADRESS वरून फिरून परत आलेली
आता तर वायारीच नाही मोडेम सुद्धा नवे आहे कदाचित
पण तरीही माझ्याच नावाने बोंबलतायत सगळे

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

"क्षण तुटणार्या भेटींचे
अन थकलेल्या बोटांचे
ते खरेच Audibles सारे
वा Offline भासांचे
थकलेत हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले "

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

तुझ्याकडे माझी "डाऊनलोडिंग" असे दिसणारी एक फाईल
मी ही हट्टी
माझ्याकडे तुझी "टायपिंग" असे दिसणारी एक राखाडी खिडकी
Archieve केलेले काही मेसेज काही voicemails अजूनही
थोडसं chatting बरचसं ping अजूनही
बाकी invisible होऊन गेलो आहोत
तुझ्या लिस्ट वर असलेला मी, माझ्या लिस्ट वर असलेली तू
आणि आपल्याशी conference करणारे ते सगळे
आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

"महिना अखेरीस तेव्हा डोक्याची झाली माती
नव्हताच बिलांचा दोष, कंपनीच फसवी होती
फसवेच स्पीड, फसवेच plan
हे LAN सदा गुरफटलेले"

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

Patience संपू शकतात, problems संपत नाहीत
नाती तुटू शकतात, connections जुळत नाहीत
history मधली पेजेस डीलीट होत जातात
लिस्ट मधले फ्रेंड्स idle होत जातात
Inbox मधले forwards दुर्मिळ होत जातात
कॉम्पवरचे वायरस ही नकळत विरळ होत जातात
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला या कवितांना   
कागद ऐवजी ब्लॉग वर खरडलेल्या चारोळ्यांना
विसरत चालल्या आहेत password न बदलता बदलेल्या वाटा
विसरत चालले आहे रात्री तीनचे ठोके देणारे घड्याळ
आणि विसरत चालले आहेत ट्यूब बंद केल्यावरही लकाकणारे डोळे

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

मी favourites केलेया sites वेड्यागत अजुनी बघतो
तुटलेली दाबत बटणे की-बोर्ड वर खद खडखड करतो
गुंतून स्वप्न अंतास सत्य हे आज मला उलगडले

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

- साभार समाप्त

पावसाचे थेंब


एकेदिवशी जमिनीच्या आत साठवून ठेवलेल्या उष्म्याचा दाह अनावर होईल
समोरच्या सुकल्या डोंगरावरही बसेल त्या वणव्याची झळ आणि पडेल एक चुकार ठिणगी
चारी दिशांना लागेल चाहूल, चौखूर उधळत येणाऱ्या मृगाची
पानांचा एक उत्साही घोळका त्या बेफाम वावटळीवर स्वार होईल अलगद
अचानक आभाळाचा रंग इतका गडद होईल..वाटेल आता सारं सारं संपून जाणार

मग येतीलच ते...पावसाचे थेंब

गाठतील तुला गल्लीच्या तोंडाशी, एखाद्या जुन्या मित्रासारखे
तू कुठे चाललास? ह्याच्याशी त्यांना काय घेणं देणं
वाटेत आलेल्या प्रत्येकाला कडकडून भेटण्याचा रिवाजच आहे त्यांचा
लावतीलच मग ते तुझ्या पांढरया शर्टवर थोडासा चिखलाचा गुलाल,
शिंपडतील अंगावर थोडसं मातीचं महागडं अत्तर

सोडणार नाहीत तुला ते...पावसाचे थेंब

सुरुवातीला अलगद रिमझिमणारे मोती, हळू हळू टपोरे होत जातील,
तलवारीसारखे धारधार होतील, पात्यासारखे लक्ख होत जातील
एकाक्षणी इतके गार होतील की गोठून जातील,
आणि मग मनाच्या माजघरात लपलेल्या मरगळीला
रस्त्यावर आणून असं झोडून काढतील की पुन्हा पाणी मागणार नाही

सोडणार नाहीत तुला ते...पावसाचे थेंब

तुला वाटेल मी साहेब कडक सुटातला गाडीतून फिरणारा, मला कोण हात लावणार?
अरे त्यांनी मनात आणलं तर एका मिनटात घालतील आडवं एखादं झाड तुझ्या करकरीत गाडीसमोर
आणि समोरचा रस्ता असा अदृश्य करतील की तुला खाली उतरवावंच लागेल.
मग इतकं आतपर्यंत भिजवतील ना, असं वाटेल की शरीरात रक्त नाही पाणीच वाहतंय
बुटांचा fishtank होईल, छत्रीच तळं होईल आणि मनाचा समुद्र तुफान फेसाळून उठेल

असे सहज सोडणार नाहीत तुला ते...पावसाचे थेंब

तेव्हा वेड्या, कशाला शोधतोस छपराचा आडोसा
जे आकाशाला नाही पेलले, वाऱ्याला नाही आटपले
ते का तुझ्या फतऱ्या रेनकोटाला जुमानणार
तेव्हा सोड तो वृथा अभिमान, शरण जा त्या धारांना
अंगाची माती होऊन विरघळून जाउ दे त्या अखंड प्रवाहात
पसर हात त्या सुसाट वारयासमोर आणि मनसोक्त पिऊन घे ते समुद्रमंथनाच अमृत

मग बघ कसे आपलंसं करतील तुला ते

….
पावसाचे थेंब

नि:शब्द


सरेआम मासूम जान इक जब हो रही थी जलील,
चीख चीखकर बेबसी जब सुना रही थी दलील

दिल्ली बता उसवक्त कहा सोया था तेरा दिल?

हवस के मीनाबज़ारमें जब लीलाम हो रहे थे जमीर,
रामलीला की भूमीमें जब सीतामाँ पे चले तीर

दिल्ली बता उसवक्त कहा सोया था तेरा दिल?

तहजीब जब हैवानीयत में हो रही थे तब्दील,
खामोश रात के सीने में जब धस रही थी कील

दिल्ली बता उसवक्त कहा सोया था तेरा दिल?

रवायतों के गुलामों ने कुछ न कहा, सियासत के इमामों ने कुछ नहीं कहा
क्या तू भी गर्दन झुकाए हो गयी है उनकी साजिशोंमे शामिल

सच बता दिल्ली क्या कुछ नहीं कहता तेरा दिल?

Friday, September 30, 2011

" मना सज्जना "


प्रथमेश जो ईश सर्वां गुणांचा।
विलंबास प्रारंभ तो नित्य त्याचा॥
वदूनी अपशब्दे सर्व त्रिवार वाचा।
धरू मार्ग समस्त सज्जनगडाचा ॥१॥ [प्रथमेश, उमेश, महेश]

प्रभाते मनी प्रेम चिंतीत जावा।
दिसता दरी बाबू मागे स्मरावा॥
मंदार हा थोर सांडूं नये तो।
त्याच्यामुळे झोल नेहमीच होतो ॥२॥ [प्रेम, बाबू, मंदार]

नको रे मना द्रव्य ते मंडळाचे।
बूट नवीन जर पायांसी काचे॥
टोल मारणे पाप ते कर्म खोटे।
न होतां जया* सारिखें दुःख मोठे॥३॥ [सचिन, *जय]

सदा सर्वदा प्रातसमयी निघावे
न रामप्रहरी लोकांस लटकवावे    
आसन व्यवस्था चोख मागे करावी
नसल्यास वाहने सोय त्वरा बघावी ॥४॥ [ सगळे आणि जय esp]

मना लोचना चूकवीं येरझारा
खालापूरातील प्रवेशद्वारा
चुकते करावे प्रथम हिशेब सारे
वड्यासह चटणीची इच्छा नको रे ॥५॥ [ मंदार आणि जय]

कोथरूड प्रांती उष्मादाह होता
*चहापानास विवाद नसावा
विलंब टाळुनी मूक मार्गस्थ व्हावे
क्षुधाशांती साठी वणवण फिरावे ॥६॥ [मिताली, *श्रद्धा आणि कंपनी]

मुखी घास जाता सुपनेकराचे
उदरभरण यथेछ्च होई सकल जनांचे
मसालेभात थोर टांकू नये तो
कोशिंबिर ओरपून मानवी धन्य होतो ॥७॥ [मंदार, विशाल, मी आणि बाळा..जो बिचारा आम्ही किती ठुसतोय ते मुकाट बघत होता]

मुखे चालकाच्या जाता मावा सुपारी
दिसे चंद्रमा त्यास भर दुपारी
तांबुल विलास भजुनी मुखश्रुद्धी
रंगुनी रामरंगी रंगीत झाली  ॥८॥ [ड्रायव्हर, मह्या आणि रचना/मिताली]

समोर दिसता कासचे रम्य पठार
क्षणी पडतसे सर्व श्रमांचा  विसर
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
*शिणावे परी तृप्त न होत कांहीं ॥९॥ [मिताली आणि तेजस]

*मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
**आपलीच आपण चित्रकारी करावी॥
दिसे पांडू ते बाग सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥१०॥ [हे specially **राक्या आणि *जॉनीसाठी]

मना जी स्थळे नजरेस न गेली।
जनीं आपुली ते तुवां हानि केली॥
पिवळ्या फुलांमागे जो लीन आहे
कीटकांचे पंख तो लक्ष लावूनि पाहे॥१०॥ [मिताली, जय आणि कॅमेरा वाले]


मना टायरांचे परी त्वां जळावे
तिन्ही सांजवेळी पाणी पळावे
सदा लोककाजीं झिजे देह ज्याचा।
लाईनचा माणूस बहु गुणाचा ॥११॥ [मह्या आणि बस]

मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥
कृपा रघुवरा वाट निर्धास्त झाली
सांभाळिता SLR दमछाक झाली ॥१२॥ [ अश्विनी, श्रद्धा आणि प्रिया]

भगर आमटीचा मुखी घास घेता
धन्य रामदासी तो अन्नदाता
अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥१३॥ [ to all ]

चांदण्या राती सहलीस जावे
भूत पिशाच्च न जवळी ठरावे   
जो देह रामनामे रक्षित झाला
भक्त निवासी ताणुनी निद्रिस्त झाला   ॥१४॥ [श्रद्धा आणि प्रेम]

काकडारती प्रीति रामीं धरावी।
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी॥
उरमोडी सम मार्गक्रमणा धरावी
अन्यथा पुन्हा वामकुक्षी करावी ॥१५॥ [मी,तेजस, प्रथमेश, बाबू, विशाल आणि अश्विनी]

उन्हे वाढता पावले मागे फिरावी
तरी कोणी कष्टाने गुहा पहावी
मुखी कोंबता मुठ शेवकुरमुरयाची
धरावी मग पुढे वाट ठोसे घराची ॥१६॥ [उमेश, मंदार]


दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
मामा पाहता मौज तेथेचि आहे॥
जनी सर्व कोंदाटले ते का कळेना
मर्कटलीला करून पोट भरेना ॥१७॥ [मंदार, मृणाल, विशाल  ]

भोजन समयी पुन्हा भीड* व्हावी
मटकी आमटी तीच पुन्हा गोड व्हावी
घरी कामधेनू** पुढें ताक मागें।
काउंटर वरी मग बहु रीघ लागे॥१८॥

[* भीड हा शब्द द्वयर्थी वापरला आहे, भीड म्हणजे हिंदीतली गर्दी असा आणि मराठीतली लाज असा, कारण extra ताक आणि पापड मागताना सर्वांनाच भीड वाटत होती)** ही ओळ ओरिजिनल आहे, मला अध्याहृत अर्थ जय, प्रेम आणि राकेश ला कळेलच बाकी सुज्ञास सांगणे न लगे ]

अभिप्रायी धारिष्ट जीवीं धरावे।
पप्पूचे पकवणे सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।***
मना सर्व लोकांसि रे नीजवावें॥१९॥ *** हे माझ्या बद्दल आहे

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।
मनी मानसी द्वैत काही वसेना॥
बहूता दिसा आपली भेट जाली।
आनंदात ही सर्व कार्ये निवाली ॥२०॥

मनाची शते ऐकता दोष जाती।
समर्थाघरी पामरे धन्य होती
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहे ॥२१॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Sunday, April 17, 2011

जिंकले रे

बेभान झाले वारे, ओसंडले रस्ते रे
हरपुन गेले ध्यान, मंतरले चित्त रे
प्रयत्नांती प्राप्य झाले सौख्य जे अप्राप्य रे
अंतरी घेऊन ध्यास.. जिंकले रे जिंकले रे

मातले तन, मातले जन, उल्हासिले हर गात्र रे
भरून आले ह्रुदय एकेक, बहरून आली रात्र रे
फेडले मुद्दल सारे, फेडले आज व्याज रे
सार्थ मनांचे इप्सित साऱ्या ..जिंकले रे जिंकले रे

रिक्त झाली आसवे आणि उधाणले हास्य रे
उन्मत्त झाले सागर, स्वर्ग झाले ठेंगणे
एक नाद, एक घोष, एक झाले राष्ट्र रे
एक स्वप्न घेत उराशी.. जिंकले रे जिंकले रे"


- नवीन वर्षाची पहिली कविता टीम इंडिया साठी :)

जाणीव

एक दिवस विसरून गेलो हात वर आकाशाकडे पसरणं
जे हवं ते स्वत:च पायाखालच्या जमिनीत शोधायला लागलो

कळलंच नाही कधी नास्तिक व्हायला लागलो

पाय देऊन तोडून जाणारयाचा चेहरा मी पाहिला नाही
घसरलेली वाळू पुन्हा उचलून डोंगरावर घालायला लागलो

कळलंच नाही कधी सहनशील व्हायला लागलो

वाटलंच नाही कोणी सावरायला येईल जवळ घेईल
एकटं वाटेल तेव्हा आपल्याच हातानी पाठीवर थोपटत राहिलो

कळलंच नाही कधी खंबीर व्हायला लागलो

संवादासाठी संगत न मिळो अथवा न दिसो चेहरा कुणाचा
आरशात पाहून मी त्याच्याशीच वार्तालाप करत राहिलो

कळलंच नाही कधी तत्वज्ञ व्ह्यायला लागलो

ठेवला न राग कुणाचा ना मनी लोभ कशाचा
दोन्ही गाल लाल होऊनही मी हसतच राहिलो

कळलंच नाही कधी विदुषक व्ह्यायला लागलो

उल्हासित आषाढ झालो, बिरहाराती वैशाख झालो
घन बरसता मन झालो, मन बरसता घन झालो

कळलंच नाही कधी कवी व्हायला लागलो

Sunday, April 3, 2011

आठवण ठेवा

खिशावर कागदाचे झेंडे लावून परस्परांना शुभेच्छा पाठवताना
आपणही या काळ्या मातीचं काही देणं लागतो याची

आठवण ठेवा

दूरदर्शनवर सैन्यदलाचं संचलन पलंगावर आडवं लोळून बघताना
किमान राष्ट्रगीताला तरी ताठ मानेनं उभं राहून मानवंदना देण्याची

आठवण ठेवा

मॅन्चेस्टरचे लाल झुळझुळीत कपडे घालून बियरचे ग्लास नाचवताना
त्याच कपड्यांविरुद्ध सत्याग्रह करताना बाबू गेनूच्या छातीवरून गेलेल्या ट्रकची

आठवण ठेवा

कालपर्यंत कमरेचं उतरवून ठेवणारयांना पद्म पुरस्कार देताना
स्वाभिमानाचा एक पंचा तेवढा नेसून सारा देश फिरलेल्या महात्म्याची

आठवण ठेवा

महापुरुषांच्या नावाच्या विड्या ओढताना आणि शहरांच्या नावाचे तंबाखू चघळून
निर्लज्जपणे जमिनीवर थुंकताना ती मिळवताना किती रक्त सांडले याची

आठवण ठेवा

बातम्यांच्या नावाखाली आरडाओरड करताना, हुतात्म्यांचे भांडवल करताना
तुरूंगात उघड्या अंगावर लाठ्या एक शब्द न काढता झेललेल्या तरूणांची

आठवण ठेवा

धृतराष्ट्राप्रमाणे मुकाट डोळे मिटून वर्षाकाठी लाखोंनी लोकसंख्या वाढवताना
यवनांच्या आक्रमणांना थोपवताना पानिपतात कापल्या गेलेल्या पिढ्यांची

आठवण ठेवा

रांगेत उभे राहायचा आळस करताना, पण शंभराची लाच त्वरेने पुढे करताना
ह्याच स्वराज्यासाठीच अंदमानात काळ्यापाण्याचे घाणे ओढणारया तात्यारावांची

स्वातंत्र्याची ६३ वर्षे उलटून गेली तरी न बदललेल्या परिस्थितीची
आणि ती बदलण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची

आठवण ठेवा!!!

Saturday, July 17, 2010

बालपण

उलटून आल्बमची पानं काही वर्ष मागे जावं
बंद कपाटाच्या आडून माझं बालपण पुन्हा यावं

घेऊन कागद हाती, रंगात बुडवून बोटे,
ओढाव्या रेघोट्या, थोडे मारावे फराटे
कातराव्या झिरमिळ्या, सोनेरी कागदाच्या
वेचाव्या पाकळ्या मुठी बकुळफुलांच्या

पारंबीच्या झुल्यांवर उंच उंच जावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं

काढावे देखावे तसेच त्रिकोणी डोंगरांचे
दिसावे क्षितिजावर पुन्हा आकडे चाराचे
गवताच्या घरात दोन माणसं काड्यांची
खळीदार चेहरे अन पोकळ डोक्यांची

नागमोडी नदीमागुन सूर्यानेही हसावं ,
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं

काडेपेटीचे खुळखुळे आणि शाळेची इमारत
फडकत्या पताका लावून करावी सजावट
धावदोऱ्याने भरावे मऊ कापडाचे तागे
मळून चिकणमाती हातही सुगंधी व्हावे

जिलेटीनच्या कंदिलासारखं वाऱ्यावर डोलावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं

सुट्टीत मांडावे डाव टिक्कर कवड्यांचे
व्यापारी बनून ढीग जमवावे नोटांचे
शिडीने वर चढावं साप चावून खाली यावं
पत्त्यांचे हात ओढताना जेवण विसरून जावं

आजीच्या गोष्टी ऐकत गोधडीवर निजावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं

एक दिवस तरी माझ्या मनासारखं व्हावं
दिव्यातल्या राक्षसाने गोष्टीतून बाहेर यावं
हातातलं जादूचं घड्याळ थोडं फिरवावं
उडत्या गालिच्यावर बसून पुन्हा मागे न्यावं

बंद कपाटाच्या आडून परत सारं यावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं

Monday, July 5, 2010

दान

माफ कर माये,

तुझ्या पदरात अवसेच दान घालण्याइतकं
मनाचं ऐश्वर्य आता आमच्याकडे उरलं नाही
तुझ्या खांद्यावरची भुकेली पोर रडत असेलही
पण ते ऐकू येण्याइतकं आमचं हृदय ओलं राहिलं नाही

यंदाच्या दिवाळीत अजून पाच दहा टक्के वाढतील का याचीच आम्हाला पडलीय

माफ कर माये,

तुझ्या नवऱ्याच्या उघड्या अंगावर पडणारे
चामड्याचे आसूड ऐकू येत नाहीत आताशा
बुगबुग वाजणारं ढोलकं कानांना छळत नाही
आणि मुलाच्या पाठीवरचे कोवळे वळ डोक्यात झोंबत नाहीत

आम्हाला फक्त हातातली कडक लक्ष्मी दुप्पट कशी होईल याची पडलीय

माफ कर माये,

दगडाच्या चिपळ्या हल्ली आतल्या पांडुरंगाला साद देत नाहीत
पेटीचे केविलवाणे काळे पांढरे सूर समजत नाहीत आम्हाला
तुझ्या म्हातारयाच्या आंधळ्या बासरीतलं करुण आर्जव उमगत नाही
आणि शर्टाच्या खिशाकडे आमचे हात नकळतही सरकत नाहीत

फक्त त्यातल्या blackberry ची थरथर ऐकण्यास आमचे कान आसुसले आहेत

माफ कर माये,

तुझ्या हातातल्या टोपलीवर अवलंबून असलेलं तुझं घर
आणि धावत्या गाडयांमध्ये अस्ताव्यस्त झालेला संसार दिसत नाही आम्हाला
डझनभर फळांचे दहा रुपडेही बाजूच्याने द्यावेसे वाटतात
हातातली फोडलेली संत्री नाक चाळवत नाहीत आता

फक्त तुझं कष्टाने काचलेलं शरीर पाहतांना आमच्या भुकेल्या नजरा चाळवल्या जातात

माफ कर माये,

तुला श्रम देणारे, देशोधडीला लावणारे
भिकारी तर आम्हीच आहोत

तेव्हा आता आणखी मागून लाजवू नकोस,
पण जमल्यास आमच्यासाठीच
वाण माग देवाकडे थोडं

परत फिर, जपून रहा,
शक्य असेल तर विसरून जा,

बस जाताजाता मांडीला हात लावून
आशीर्वाद तुझा देऊन जा...

Sunday, July 4, 2010

मनातल्या मनात

उजाडत्या दिवसाबरोबर अंगणात ये
उमलत्या फुलांसारखे आळोखेपिळोखे देत
हात फिरवून चेहऱ्यावरचं दंव सारं टिपून घे
जांभई देतादेता थोडी कोवळी किरणंही पिऊन घे

कोवळ्या किरणांकडे पाहत हात पसर
बघ कोणी जवळ येऊन अलगद हातात घेतंय का

जरा बाहेर पड गावाची वेस ओलांडून
गवताच्या पिवळ्या पात्यांसंग डोल तुही
बुजगावण्यासारखी कावळ्यांना उडव
पक्ष्यांची बोबडी चिवचिव भरून घे मनात

मग हिरव्या पानांच्या सळसळीकडे कान दे
ऐक दुरून कोणाची शिटीवर साद येतेय का

खिडकीच्या थंड दांडीवर हनुवटी रेलून
मागे पडणाऱ्या झाडांसारखी मागे जा
भुरभुर उडणाऱ्या केसांवर हात फिरव
झुळझुळ वाऱ्यावर डोळे मिटून पड क्षणभर

दचकून उठ आणि इकडेतिकडे पहा
शेजारची खुर्ची अजून रिकामीच दिसते का

मग खिशातल्या मोबाईलशी चाळा कर
आवडीचे गाणं सापडतंय का बघ कुठे
खुशीत येऊन मनात गुणगुण थोडसं
खुर्चीच्या दांडीवर बोटांनी ताल दे

आणि समेवर येताच टिचकी वाचवून उघड डोळे
बघ हसून समोरून कोणी दाद देतंय का

बसमधून उतरून एकटीच निघ मग
स्टेशनसमोरच्या अलोट गर्दीत हरवून जा
ऑफिसच्या दिशेने झपझप पावलं उचल
तिथे पोचून कागदांच्या ढिगार्यात बुडून जा

मनातल्या मनात फक्त एकदा विचार आणून बघ
आता या स्थितीतही कोणी तुझ्यावर कविता लिहितंय का

वचन

"एक दिवस तुझं तूच ठरवून टाकलंस आणि
मीही सवयीने डोळे मिटून हो म्हणून टाकलं
प्रयत्न करू म्हटलं, विसरून जाऊ म्हटलं,
बस एक विचारायला विसरलो, विसरायचं कसं

पानांपानावर पसरलेलं, एवढ्यातंच पुसायचं कसं
खोडाखोडांवर कोरलेलं, एवढ्यातंच खोडायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

सारं सारं विसरून जायचं
मनात काही ठेवायचं नाही
ओठांवर काही आणायचं नाही
आणि कागदावरही खरडायचं नाही

रात रात जागून लिहिलेलं एका फटक्यात फाडायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

यापुढे भेटायचं नाही, बोलायचं नाही
एकमेकांबद्दल विचारायचंही नाही
उत्तर मागायचे नाही, प्रश्न करायचे नाही
संकेत नाहीच, साधा संपर्कही ठेवायचा नाही

पात पात आणून विणलेलं, क्षणात उसवायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

पुन्हा एकत्र चालायचं नाही
पुढेमागेही घुटमळायचं नाही
भूतकाळ उकरून काढायचा नाही
भविष्यांच मनोरथ सजवायचं नाही

वर्तमानात पुन्हा गुंतायचं कसं, एकवचनाचं व्याकरण चालवायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

सांज सांज जळायचं नाही
थेंब थेंब गळायचं नाही
काट्यासारखं रुतायचं नाही
तीळ तीळ तुटायचं नाही

नसांनसात भिनलेलं, इतक्यातंच कापायचं कसं..
एवढंच सांग, जगायचं कसं?

वितळायचं नाही, विझायचं नाही
भिजून हळवंही व्ह्यायचं नाही
दुखुन घ्यायचं नाही, खुपवून घ्यायचं नाही
रडायचं तर नाहीच नाही

अनवाणी उन्हात चालायचं कसं, स्वत:च्याच सावलीपासून लपायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?"

Saturday, July 3, 2010

चेपेन चेपेन... My version (original composition by Sandeep Khare-Saleel Kulkarni)

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन,
सीरिज हरलो, कपही पाडला
इज्जत म्हणते चेपेन चेपेन..

सराव कमी दौरयावरती पार्ट्या जास्ती झाल्या रे
केस आणी केक यांच्या चर्चा जास्ती झाल्या रे
दीपिका म्हणते पत्ता कट
युवराज म्हणतो कापेन कापेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

चार बाहेर्,एक बंपर, असली सगळी बॉलींग हयांची
९० ओवर टाकत नाहीत,रक्क्म का नाही कापत त्यांची
ब्रेटली म्हणतो शेकवेन शेकवेन
बकनर म्हणतो ढापेन ढापेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

मैदानावर धमक्या देती, वर बंदीची शिक्शा देती
पेपर आणि लोक ह्यांचे तरी आमच्यावरच चढती

माकड म्हणते हुपहुप हुपहुप
पाँटिंग म्हणतो कोर्टात खेचेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

पुण्याईवर मळते आहे वन-डे टीमचे तिकीट रे
सीनियर्सना ही दिसते आहे आयपीएलचे पाकीट रे
गिली म्हणतो टाटा टाटा बाय बाय
तिकडे जाऊन छापेन छापेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

पुन्हा पडेल पाउस

पुन्हा पडेल पाउस, पुन्हा सुचेल कविता  
भिजवेल धरेला, पुन्हा सचैल सरिता
पुन्हा बरसेल घन, पुन्हा उमलेल मन
लाजेल वसुंधरा, पुन्हा धुक्याच्या आडून      
पुन्हा फुलतील पाने, पुन्हा उधळेल वारा  
सूर मधुर मल्हार, पुन्हा छेडतील धारा  
पुन्हा कडकेल वीज, पुन्हा हरवेल नीज
मातीत मृगाचे, पुन्हा प्रसवेल बीज    
पुन्हा कोसळेल आषाढ, पुन्हा न्हाईल श्रावण
प्रेमात पडण्या नव्याने, पुन्हा होईल कारण
 
पुन्हा पडेल पाउस, पुन्हा सुचेल कविता  
जगण्याची आस, पुन्हा मिळेल जीविता

Saturday, April 3, 2010

किमया

अजब तुझे हे राज्य विधात्या अजब तुझी दुनिया
मर्त्य मानवाच्या शब्दांत वर्णू कशी ही किमया

कसे रुजविलेस बीजाच्या मनी स्वप्न आभाळावर जाण्याचे
कसे शिकविलेस यमुनातीरी, बासाला स्वर गाण्याचे
तहान भागवण्या डोंगरांची, सोडलेस निर्झर का रे     
की अभिषेका ओतलेस मस्तकी दूध त्यांच्या सारे   

सौंदर्य श्रावणी अप्सरांचे जमिनीवर चितारले कुणी 
अंथरले वाटेत त्यांच्या गालिचे जरतारीचे कुणी
उडणारे मखमली रंग नेमके वाऱ्यावर सांडलेस कसे
भुलवाया त्यांसी रान नेटके प्रदर्शनी मांडलेस कसे

भुरभुरणाऱ्या बर्फाचा एवढा हिमालय बनवलास कसा
चिकट मेणाच्या पोळ्यामध्ये मध फुलांचा गाळलास कसा
ढगांच्या मध्यावर इंद्रधनुषी पूल बांधलास कसा  
अधांतरी अंतराळात पृथ्वीचा गोल टांगलास कसा 

वाळूच्या आड दडवल्यास खोल विहिरी तेलाच्या   
सोन्यास दिलीस लकाकी भट्टीत काळ्या कोळशाच्या
कशी केलीस करणी नारळाच्या पोटी गोड पाणी 
अफाट सागरात सांडलीस मात्र मिठाची गोणी

मातीतून घडतसे मूर्ती कुंभाराच्या हातून जशी  
बनवलीस चाकावर कोणत्या दुनिया रे इथे अशी
फिरत असे आसावर गरगर जरी भोवरयापरी   
दिसत नसे का आम्हांस तुझ्या हातातली रेशमी दोरी

अजब तुझे हे राज्य विधात्या अगण्य तुझी ही माया 
शब्दांत सांगण्या सदा जन्म मज इथेच दयावा

Sunday, March 28, 2010

वाद

लिहिण्याचा प्रयत्न करताना प्रासंगिक कविता राहून गेल्याच बरेच दिवस मनाला खटकत होतं.
संवादात्मक वळणाने जाणारी कविता लिहिण्याची मजा वेगळीच आहे कारण त्यात विचारांचा प्रवाह सुरळीत ठेवणं, घटना कल्पित करणं आणि त्यातून दोन्ही पात्रांची बाजू समतोल मांडण कठीण आहे.
छोट्या छोट्या गोष्टीतूनही होणारे वाद,वादातून होणारा संवाद,कल्पना, प्रत्यंतर आणि अखेर त्यातूनच घट्ट होणारी नाती अशी ही गमतीशीर कविता     

[माझ्यासारख्या वक्तशीर माणसाच्या आयुष्यात असले प्रसंग कमीच येतात..LOLz :D
त्यामुळे ही कविता आणि त्यातला संवाद पूर्णतः काल्पनिक आहे, तरीही प्रत्येकाला आपलीच वाटेल मला खात्री आहे]


वाद

"किती उशीर केलास यायला, वेळेचं काही भान आहे का..
हाताची घडी तसूभरही इकडेतिकडे न हलवता

उजव्या पायाची बोटं जमिनीवर आपटतच तिने खडसावलं
आणि मी आणखी किती वेळ थांबावं अशी तुझी इच्छा आहे?"

"जोपर्यंत घडयाळाचे काटे तुझ्या नाजूक मनगटांना टोचत नाहीत
आणि फुगुन लाल झालेल्या गालांतली हवा जाऊन

त्याजागी खळ्यांचे गुलाब जोपर्यंत खुलत नाहीत
बस तेवढा वेळ तर थांबशील ना?" मी घाबरतंच विचारलं

"तू म्हणजे ना, बोलण्यात कधी हार जाणार नाहीस
आज काय नवीन कारण सांगणार आहेस

मी ऐकून घेते म्हणून हल्ली अतीच करायला लागलायंस
दुसरयाचा विचार करायला कधी शिकणार देव जाणे"

मी म्हटलं, "हा प्रश्न आपला तू तुझ्या देवालाच विचार
दिवसेंदिवस स्वतःचा कमी आणि तुझाच सारखा विचार करतो,

बोलण्यात फक्त हरायचं बाकी राह्यलय आता
बाकी श्वासांसासकट सगळं हरवून बसलोच आहे मी"

"एखाद दिवशी मी अशी उशीरा आले तर काय करशील"
"काय करणार...वाट बघत बसेन अशीच कोपरावर हनुवटी टेकवून"

पण थातूरमातूर उत्तराने समाधान कसं होईल तर कसलं
लगेच तिने विचारलं कशी..चातकासारखी का चकोरासारखी?

"चकोरासारखा काल्पनिक असतो, चातकासारखे पंख असते
तर आलो नसतो का क्षणार्धात उडत तुझ्यापाशी
   
खरंतर..नुसतं पिस असतो तरी चाललं असतं
वाऱ्यावर तरंगत येऊन तुझ्या कुशीत विसावलो असतो"

हे ऐकून तिची कळी जरा खुलली, पण इतक्या सहज ऐकेल तर ती कसली
तिचं उत्तर तयारच होतं, "म्हणे उडणारा रंगीत पक्षी,

मग चांगला पिंजऱ्यात डांबला असता तुला मी
म्हणजे नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहिला असतास"

मी म्हटलं, "तुझ्या नजरकैदेतलं जिणं मला मंजूर आहे
आभाळाची साथ सोडणं मला कबूल आहे, बस एक छोटीशी अट आहे

जादुगारीणीचा जीव जसा पक्ष्यात असतो तसा
तुझा जीव जर माझ्यात राहणार असेल तरंच"

मग ती वरमली, अरे वेड्या, काय एवढं मनाला लावून घेतोस सारं
आणि तुला कोंडून ठेवणं म्हणजे स्वत:लाच कोंडण नाही का

पिंजरयाचं दार उघडं ठेवलं तरी निसटणार नाहीस खात्री आहे
जीव सदैव तुझ्यातच आहे म्हणूनच तर करमत नाहीना

मी म्हटलं "चला, तेवढंच आम्हाला समाधान लाभलं  
अख्खी संध्याकाळ भांडणात जाउनही सारं शेवटी सुरळीत झालं"

वाद आज झाले, उद्याही होतील, नुसत्याच गोडीत गंमत काय
समोर फक्त तू असलीस की बास, जन्माला अजून पुरलंय काय 
  

Saturday, March 27, 2010

कवितेची सुरुवात

कधी माणसांच्या गराड्यात, उगाच एकटं एकटं वाटतं
तर कधी चाकोरीचे रस्ते धरून, गर्दीबरोबर ढकललं जावसं वाटतं
लाटेबरोबर असहाय वाहत जातं विचारांचं गलबत जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी पोटातली चीड आतल्या आत पोखरत राहते,
सहन करत राहण्याची आपलीच जुनी सवय मोडाविशी वाटते
संतापाची ठिणगी चरफडत एकेदिवशी, बंद मुठीतून बाहेर पडते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी लाखवेळा डोकं टेकवूनही लीन झाल्यासारखं वाटत नाही
मूर्तीपुढे तासंतास उभं राहूनही वाटतं, आपलं गाऱ्हाणं त्याच्यापर्यंत पोचत नाही
दगडातल्या दिव्यत्वाची शंका येऊ लागते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

गर्दीतला कोण्या 'ति' चा चेहरा एक दिवस नजर खिळवून धरतो,
बहुदा आकाशातल्या प्रकाशकाचीच आज्ञा असते तशी
मग जेव्हा कानात शेकडो व्हायोलिन्स वाजू लागतात आणि सुरांचे थेंब बरसू लागतात

कवितेला...तिथेच सुरुवात होते

मग ना छंदाच भान उरतं ना लयीचं, कोणीतरी हात धरून लेखणीला नाचवत राहतं
वाऱ्याबरोबर सांडलेली फुलं आपोआपच हारांत ओवली जावीत, अक्षरंही तशीच नकळत गुंफली जातात
हळव्या ओठांना मौनाचं भाषांतर अवघड वाटतं जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कवी आणि कवितेचं नातंच जरा विचित्र असतं, कागदावर समोर असलं तरी मनात तितकंच अव्यक्त असतं
त्याला खूप काही सांगायचं असतं पण सगळंच लिहीता येत नाही
आणि तिला सतत बोलूनही मोकळं झाल्यागत वाटत नाही

तरीही त्यांना एकमेकांची, साथ पुन्हा हवीशी वाटते जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते