Sunday, April 17, 2011

जिंकले रे

बेभान झाले वारे, ओसंडले रस्ते रे
हरपुन गेले ध्यान, मंतरले चित्त रे
प्रयत्नांती प्राप्य झाले सौख्य जे अप्राप्य रे
अंतरी घेऊन ध्यास.. जिंकले रे जिंकले रे

मातले तन, मातले जन, उल्हासिले हर गात्र रे
भरून आले ह्रुदय एकेक, बहरून आली रात्र रे
फेडले मुद्दल सारे, फेडले आज व्याज रे
सार्थ मनांचे इप्सित साऱ्या ..जिंकले रे जिंकले रे

रिक्त झाली आसवे आणि उधाणले हास्य रे
उन्मत्त झाले सागर, स्वर्ग झाले ठेंगणे
एक नाद, एक घोष, एक झाले राष्ट्र रे
एक स्वप्न घेत उराशी.. जिंकले रे जिंकले रे"


- नवीन वर्षाची पहिली कविता टीम इंडिया साठी :)

No comments: